आसच...
काल अचानक बारा वाजता हुक्की आली. रोजच्या सेमिनार लेक्चर मुळ त्रस्त झालो होतो (जे आम्ही कधीतरच अटेंड करतो). आम्हा भटक्यांना या सह्यगिरीतला मोकळा श्वास हवा असतो. गेले काही दिवस गजापुरच्या खिंडीच्या शोधात पर्णाल इतिहास संशोधन मंडळ, पन्हाळा आम्ही शोध मोहीमा राबवत आहोत. यातील आणखी एका संभाव्य खिंडीचा अभ्यास करण्यासाठी व या काँलेजच्या धावपळीतून थोडी मुक्तता मिळावी म्हणून मी आणि शिवप्रसाद शेवाळेन एका छोट्याशा सफरीचं आयोजन केलं. वाघबीळातच आम्हाला आडवण्यात आलं. त्यांनी त्यांची प्रोसिजर पार पाडली. पण एका पोलिसासोबत बाचाबाची झाली, मनजे माझा अवतारपण तसा वेगळाच आसतो, मनजे टिशर्ट नी त्यावर बटणे काढलेला शर्ट किंवा जँकेट, गाँगल, नी आसा पेहराव आसनारा कोणी शोधमोहिमा करतोय पटणे कठीणच पण लोकांनीही त्यांची द्रुष्टी बदलली पाहिजे ना, राव शाळा, काँलेजेसचा टाँपर राहिलोय, सगळे मास्तर लोक नावाजतात, पण वागतो बिंदास मनजे व्यभिचारी नाहीना. आसो, निघता निघता त्यांनी 'विचारलं कुठं निघालाय', मी बोल्लो 'विशाळगडला'. त्यांनी विचारलं 'का?' मी म्हंटलो "आसच".
मग मलकापूर मार्गे आम्ही विशाळगड, माचाळला रवाना झालो. खोल दऱ्यांमध्ये घुमनारे झऱ्यांचे आवाज, डोंगर उतारावर दिसनारी गवताची लुसलुशीत कुरणं, दुरवर दिसनारे धबधबे, इकडून तिकडे रस्ता क्राँस करणाऱ्या खारूताई नी घोरपडी ( 'रणजीत देसाईंच्या शेकरा'मध्ये वर्णन केलेल्या शेकरू सारख्या खारूताई वाटायच्या ), भन्नाट वळन, पांढरं पाणी जवळ लावलेले ट्रेकींगचे फलक आणि त्याचे कधी रस्त्यावरून तर कधी जंगलातून बदलनारे मार्ग, सुंदर डोंगरांना बोडकंपण देणारं खानकाम (पैशाच्या हव्यासापोटी निसर्गाची केलेली कत्तल, ते करणारे करण्यास परवानगी देणारे बीपबीप हत्यारेच) तरीही (पाँझिटिव्हीटी) या साऱ्या मंत्रमुग्ध करणाऱ्या निसर्गाचा आनंद घेत आम्ही चाललो होतो. एव्हाना आम्ही भल्यामोठ्या बुरजांनी शौर्यस्मारक उभं केलेल्या खिंडीत येवून पोहचलो. पावसाच्या पाण्याच्या प्रपातामुळे घळई तयार झाल्या आहेत, त्याला खिंड. म्हणणे कितपत योग्य आहे? नाही म्हणाव तर अपुरे पुरावे, पण इतिहास आणि त्या घटना महत्त्वाच्या, नी त्यांच स्मरणही.
विशाळगडावर वाघजाई मंदिर, घोड्याची टाप, आदी ठिकाणी पाहून गड उतरलो. आणि ज्यांची मुलाखत घ्यायची होती, त्यांना भेटलो नी मुलाखत ही घेतली. आम्हाला प्रस्तापित प्रवाहाला छेदनारी माहीती मिळाली. त्यांनी आम्हाला घोडखिंडही दावली. आमच्या अभ्यासाच्या प्रक्रियेत आणखी एका खिंडीची भर पडली. आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. पोटात कावळेही ओरडत होते, अनियोेजित सफरीवर निघाल्यामुळे व्यवस्था नी पैसेही अपुरे. घरीही सांगितलं न्हवतं. विशाळगडी आसतानाच घरातून फोन येवून गेलता. निघतोय बोल्लेलो. पण व्हायचा तो उशीर होणारच. आमचं कसं निवांत सगळं. निघलो. पांढऱ्या पाण्यापर्यंत सगळं ठिक होतं. पण आता अंधारही पडला नी पावसाचे थेंबही. मोठा आला तर थोडं थांबलो. मग जास्त उशीर नको म्हणून रिमझिमीतच निघालो. आशा सफरींवरती गेल्याने फक्त मन:शांती मिळत नाही किंवा इतिहासाचा अभ्यास होतो वगैरे, तर नव्या प्रदेशातून नवी उम्मीद व स्वत:ला ओळखण्याची एक संधीही मिळते.
सध्या मी सुरू केलेली travelwithshivtej ही थिम आशीच, ठिकाण फिक्स करा अगर न करा, बाहेर निघून लोकांना नवीन ठिकाण दावायला नी मलाही नव्याने पहायला चांगल वाटतय, लोकांनाही नवीन अनुभव मिळतायत, तरी तुम्हीही अनुभवू शकता, call 9049674431... किंवा ठिकाण ठरवा मी फिरवतो तुम्हाला...
@insta - https://www.instagram.com/p/CA1z-skJIMp/?igshid=14q4k7ins1ogh
@youtube - https://www.youtube.com/channel/UCZkFHCtx-JL9pPQYrYO1ppA



Comments